Thursday, 30 April 2020

व्याधीक्षमत्त्व म्हणजे काय रे भाऊ?



आयुष मंत्रालयाचे व्याधीक्षमत्त्वाचे उपाय झाल्यानंतर बऱ्याच जणांनी शंका विचारल्या, बऱ्याच जणांच्या संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. वैयक्तिकरित्या शंका निरसन केले गेले तरी यावर सविस्तर लिहिण्याची जरा चालढकल होत होती.काय करणार लिहिण्याचा कंटाळा...... पण रोज विचारल्या जाणाऱ्या शंकांचे स्वरूप बघता FAQ सारखे काहीतरी लिहिणे गरजेचे लागले. तर काही प्रश्नांच्या उत्तरादाखल लिहिलेली ही पोस्ट,


  1. व्याधीक्षमत्व वर्धक (Immunity  booster) उपायांनी कोरोना होणार नाही का?
    उत्तर - असे नक्कीच नाही. हे समजून घेणे गरजेचे आहे कि हे सर्व आपली प्रतिकारशक्ती सुधारण्याचे उपाय आहेत. कोणत्याही संसर्गजन्य आजाराविरोधात (infectious disease ) खात्रीपूर्वक इलाज देणारे उपाय नाहीत. त्यामध्ये रुग्णप्रकृतीनुसार थोडेफार वैविध्यसुद्धा येईल त्यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.

  2. व्याधीक्षमत्त्व  (Immunity ) म्हणजे काय?
    उत्तर - “त्याची ‘immunity’ लो आहे नं म्हणून त्याला सारखी सारखी infections होतात” अश्या छापाची वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो. पण व्याधीक्षमतत्व म्हणजे रोगप्रतिकारशक्ती म्हणजे रोगाशीही मुकाबला करण्याची ताकद यापेक्षा जास्त माहिती आपल्याला नसते. आधुनिक संशोधन असे सांगते की शरीराची  रोप्रतिकारक क्षमता ही  पांढऱ्या रक्तकणांवर अवलंबून असते. या पांढऱ्या पेशी २ प्रकारच्या असतात Phagocytes - बाहेरून शरीरावर आक्रमण करणाऱ्या शत्रुपेशींचा फडशा पाडणे  (जसे सैनिक शत्रूला  मारून टाकतात.) आणि Lymphocytes जे शरीरवर पूर्वी झालेले संसर्ग लक्षात ठेवतात व पुन्हा त्याच प्रकारचा हल्ला झाल्यास शरीराला ते लक्षात आणून देऊन त्वरित मुकाबला करण्यास मदत करतात. (म्हणजे IB /RAW  सारखे हो) त्यामुळे जेव्हा एखादे शरीरात एखादा संसर्ग होतो तेव्हा हे सगळ्या प्रकारच्या पेशी (phagocytes-lymphocytes चे उपप्रकार ) एकत्र काम करून संसर्ग ओळखण्याचा आणि त्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतात.
    आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे रसरक्तादि  सप्तधातूंचा सारभाग  म्हणजे ‘ओज’ सर्व शरीर-मानस-बौद्धिक कार्ये  ही  ‘ओजस’ तत्त्वावर अवलंबून असतात. ओजामुळे रोगप्रतिकारक्षमता कार्यक्षम राहते. आयुर्वेदशास्त्रात व्याधीक्षमतत्व हे ‘सहज’ (INNATE ) म्हणजे जन्मजात प्राप्त झालेले, कालज (Aquired/borrowed ) म्हणजे पूर्वी झालेल्या आजारामुळे प्राप्त झालेले किंवा मातेकडून बाळा प्राप्त झालेले आणि युक्तिकृत (artificial ) जसे कि लसीकरणामुळे प्राप्त झालेले असे ३ प्रकार सांगितले आहेत.

  3. व्याधीक्षमत्त्व  कमी होते का? आणि ते वाढवता येते का ?
    आपल्याला जन्मजात एक प्रतिकारशक्ती मिळालेली असते जी आपले कुलज प्रकृती (Genetics), जन्मदेश , जन्मकाळ(गर्भसंभव आणि प्रसूतीच्या वेळेचे ऋतुमान) यावरसुद्धा अवलंबून असते
    आणि ही  रोगप्रतिकारक्षमता आपला आहार-विहार (diet  and  routine हो ), दिनचर्या, व्यायाम , मानसिक स्थिती यासगळ्यांवर अवलंबून असते. (आठवतंय का,आपणच म्हणतो कि पूर्वी तर हा त्रास मला होत नसे पण आता जरा काही झालं कि लगेच त्रास सुरु होतो.) याचे कारण कदाचित असेही असू शकते कि शरीराने आखून दिलेले आहार-व्यायाम-दिनचर्या-मानसिक शांततेबद्दलचे नियम आपण सतत दुर्लक्षित करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणारच ना? तुम्हीच तुमच्या बँक अकाऊंटमधून फक्त पैसे काढत राहिलात आणि काहीच जमा केले नाहीत तर तुमचा बॅंकबॅलन्स  आटणारच आहे. याउलट जर तुम्ही तुमच्या शरीररूपी अकाउंटमध्ये चांगले अन्न-व्यायाम-शांत झोप (दिनचर्या-ऋतुचर्येचे पालन) यांची नियमित डिपॉसिट्स करत राहिलात  तर तुमचा बॅंकबॅलन्स तगडा असेल आणि  एखादा आजार होणार असेल त्यावेळी जर शरीराची दोष-धातू-मल-ओज हि चौकट भक्कम असेल तर एखादा आजार होणारच नाही किंवा तो होण्याचा वेग कमी असेल किंवा त्याची लक्षणे सौम्य स्वरूपाची असू शकतील.

  4. घरी च्यवनप्राश नाही तर आता कुठे जाऊ आणायला??
    लक्षात घ्या, च्यवनप्राश “म्हणजेच(??)” तंदुरुस्ती हे जे काही जनमानसात रुजलंय ना ते आधी मनातून काढा. हे स्तोम आता इतकं वाढलंय  ना की  अवलेह स्वरूपातील दुसरं औषध दिलं तरी काही रुग्ण त्याला च्यवनप्राशच म्हणतात. च्यवनप्राश हे ओज वाढवणारे रसायन औषध आहे. पण च्यवनप्राश हे फक्त एकच रसायन औषध नाही. च्यवनप्राश उपलब्ध नसल्यास आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने इतर रसायन औषधेसुद्धा वापरता येतील. च्यवनप्राश किती खावा हे सांगताना चरकाचार्यसुद्धा म्हणतात की पचायला जाड असल्याने भूकेवर परिणाम होणार नाही अश्या मात्रेत योग्य वेळी घ्यावा. यावियाशी शंका असेल तर तुमच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. बरं  दुसरी गोष्ट अशीही की  रोज करण्याजोगे तब्बल १० साधे-सोपे उपाय आयुष्य मंत्रालयाने सांगितले आहेत. वनौषधियुक्त काढा (Herbal  Tea ), हळदीचे दूध (गोल्डन मिल्क), आहारात ऋतूनुसार मसाल्यांचा वापर,रोज करायचे व्यायाम-योगासने-प्राणायाम-ध्यान , नस्य ,गुळण्या ,वाफ घेणे असे कितीतरी उपाय आहेत.यातले आहारीय उपाय तर आपल्या मसाल्यांच्या डब्यातच सापडतील आपल्याला इतके सोपे आहेत. ते आवर्जून करा. स्वच्छतेचे नियम पाळा . अनावश्यक स्पर्श टाळा.
    सोशल मीडिया आणि बातम्या बघून गांगरून जाऊन काहीतरी शॉर्टकट्सच्या आहारी लागण्यापेक्षा शास्त्र जाणून घेऊन मन खंबीर करा. ‘ब्रेक द चेन’ हे फक्त संसर्गालाच नाही तर नकारात्मक विचारांनाही सांगा मग बघा आयुष्य किती छान वाटते. बाकी आम्ही वैद्यगण  तुमच्या मदतीसाठी आहोतच.

वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक. 

९८७०६९०६८९

(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०१ मे  २०२० रोजी आपल्या  https://samanwayayurved.blogspot.com/2020/04/blog-post.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही.)


Wednesday, 22 April 2020

Mango and Ayurveda.



               Spring season is always delightful….. Pleasant climate, singing cuckoos, blooming flowers, tender greenery makes everyone happy. One more reason that we all Love this time of the year is MANGOES. I’m sure that this diversified country is definitely united over these golden fruits. We are MANGO PEOPLE after all. every mango lover starts eying mango trees, us, city people look for those “Mango only” shops. So many different varieties of mangoes are available and relished all over India. Alphanso, raival, kesar, benganapalli,badami, dashhara,payari,langada, totapuri, mulgoba, Neelam, rajapuri……. The list goes on and so is our love for mangoes.  We also enjoy many mango preparations like aamras, aam panna, mango pickle,sweet mango preserve, mango chunda, mango kasundi, mango pulissery, raw mango and prawn curry,raw mango chutney and so on…. Mango is popular across the india. 

Ayurveda has mentioned qualities of mango at length. There are mentions of mango fruit in vedas. Tender baby mangoes (bala amra), raw mangoes (taruna amra) and ripe mangoes (pakva amra) have different qualities. 


Raw mango - 

               आम्र बालं कषायाम्लं रुच्यं मारुतपित्तकृत् ।

               तरुणं तु तदत्यम्लं रुक्षं दोषत्रयास्रकृत् ।।

Amra bala kashayamlam ruchyam marutpittakrut |

Tarunam tu tadatyamlam ruksham doshtrayasrakrit ||

           Tender baby mangoes which are generally eaten just like that commonly used as whole in pickle or stored in salt water are usually kashaya (pungent) and amla (sour) in taste, amla vipaka and ushna guna. It is also Ruchya (stimulating taste). It is also vata-pitta predominant. 

             Raw mango is very sour , increases dryness and vitiates all three doshas and blood as well. It is also rich in alkalies and Vit. C. but if eating it in more quantity can lead to digestive upsets which  implies that we should consume it in moderation.
Traditionally Raw mango pulp is used for bathing as a treatment of prickly heat treatment. Grated mango pulp is used for eye pack to relieve strain.Mango seed is kahsaya (astringent) intaste and used in some traditional remedies of tooth powder.It helps in tooth cavities, tooth sensitivities,bad breath and gum diseases like bleeding gums,pyorrhea.Mango leaves are one of the ‘Panchapallava’ and used for disinfection and aroma.


Ripe mango - 


                पक्वं तु मधुरं वृष्यं स्निग्धं हृद्यं बलप्रदम् ।

                गुरु वातहरं रुच्यं वर्ण्यं शीतमपित्तलम् ।।

                रसस्तस्य सरः स्निग्धो रोचनो बलवर्णकृत् ।

Pakvan tu madhuram vrushyam snigdham hridyam balapradam |

Guru vataharam ruchyam varnyam sheetamapittalam ||

Rasastasya sarah snigdho rochano balavarnakriy |

Ripe mango is sweet to taste, vrushya (aphrodisiac), snigdha (provide oleation), hridya (cardiotonic - beneficial for heart health) , balaprada (provides strength), guru (difficult to digest), vatahara (pacifies vata dosha), ruchya (stimulates taste), varnya (improves complexion), sheeta (cold), apittalam (reduces pitta) and mango juice/pulp is sara (mild laxative),also snigdha (provides oleation), bala-varnakrut (improves complexion and provides strength).
According to some scientific studies, the more ripe the mango is, the amount of carotene in it. Carotene is a precursor of Vit. A, hence it is better to have mangoes regularly in this season.

Here are few traditional mango recipes which are  quite enjoyable ,


  • Aam Panna - It is called as ‘Panak’ in Ayurveda texts.

Mango pulp - 1 cup
Sugar          - 1 - 1.5 cup (depending on sourness of raw mango pulp)
Salt
Water
Bhimseni camphor
Cumin powder
Black pepper powder
Cardamom powder
Procedure -
Remove seeds and steam mango pulp.
Add sugar as per sourness of the pulp and mix it with the blender.
Add water ,camphor,cumin-cardamom-black pepper powder as per taste.
This panak is originally ushna (heat producing) and pittakarak (causing Pitta) but adding cumin,camphot,black pepper and cardamom helps to sooth it down, reduces heat, also raw mango is rich in alkalies and vitamin C hence is really helps body to rehydrate during summer where we mostly loose water and salts due to sweating.

  • Ripe mango preserve (Aam ka Murabba)

    Ripe mango - 1 cup (peeled and cut into pieces)
    Sugar          -  1 ½  cup
    Water          - ¾ cup
    Cloves        - 7-8

Procedure

  1. Add water and sugar together to boil to make  sugar syrup.(as we call ‘don tari paak’ in  Marathi.)

  2. Add mango pieces and cloves .

  3. Mixture will be a bit due to mango juice so cook it up a bit until it thickens.

  • Amba daal - Traditional Marathi chutney of Raw mango and Chana dal (Bengal gram dal)

    Chana Dal           - 1 cup (Soaked for 6-8 hrs or preferably overnight)
    Raw mango pulp - 1 cup (Grated)

Sugar                  - as per taste

Salt
Grated fresh coconut - as per palate.
For tampering - mustard, cumin, chillies , asafoetida and curry leaves.

Procedure -

  1.  Grind soaked chana dal in grinder.

  2. Mix grated raw mango pulp, sugar and salt in it. 

  3.  Tamper oil with cumin,mustard, asafoetida,curry leaves (Tadaka) and mix it with chutney.

So let’s dive in this Mangoliciouos world with benefits of Ayurveda.


Dr. Snigdha Churi-Vartak.

9870690689.

Note - This article is written by Dr. Snigdha Churi-Vartak and it’s content is copyrighted. One can share this article without any changes in the matter and with the author's name.



Tuesday, 7 April 2020

खाता रहे मेरा दिल ?? (Do’s and Don'ts of वसंत ऋतुचर्या )


चित्र सौजन्य - ReSanskrit website




                 गेले काही दिवस आपण COVID - 19 च्या निमित्ताने आहार, विहार तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी काही उपाययोजना पाहिल्या. त्यांना सर्वांचाच उत्तम प्रतिसाद मिळाला. मानसिक ताण-तणाव आणि आहार या विषयावर तर इतके प्रश्न आलेत कि सविस्तर लिहावे लागते आहे. मानसिक ताणाविषयी आपण काल माहिती दिली आणि  आहाराविषयी आज पाहणार आहोत. आहाराविषयी शंकांपैकी “सध्याच्या वातावरणात काय खावे, कसे खावे, किती खावे ,तसेच व्याधिक्षमत्त्व (Immunity ) वाढवण्यासाठी काय करावे याविषयी प्रश्नांचा रोख अधिक होता. म्हणूनच आता आहार या मुद्द्यावर सविस्तर लिहीत आहे. 

              व्याधिक्षमत्त्व हे फक्त औषधाने मिळवता येत नाही. म्हणजे व्याधिक्षमत्त्व  निर्माण करण्यासाठी आयुर्वेदामध्ये औषधे आहेतच पण कायमचे तसेच अधिक प्रभावी व्याधिक्षमत्त्व निर्माण व्हावे यासाठी सद्वृत्त (Diet and Routine Correction) अधिक महत्त्वाचे आहे आणि यासाठी ऋतुचर्या म्हणजेच ऋतूनुसार आहार-विहार अतिशय महत्त्वाचा  आहे.भारतीय कालगणनेनुसार सध्या वसंत ऋतू सुरु आहे.या ऋतूमध्ये कफदोषाचे नैसर्गिकरित्या प्रकोप होत असतो. म्हणजे असे कि शरीरात निसर्गतःच असणारा कफ दोष थंड ऋतुमुळे (हेमंत ऋतू) वाढतो,साचतो. आणि उष्णता मिळाली (वसंत ऋतू) कि पातळ होतो.(कल्पना करा हं, थंडीमध्ये सतत बर्फ साचला की मोठे हिमखंड तयार होतात आणि उष्णता वाढली की हे हिमखंड वितळून नद्यांना पूर येतात.) त्याचप्रमाणे हा वाढलेला, साचलेला कफ पातळ झाला कि शरीरात जी स्थिती तयार होते त्यास कफप्रकोप असे म्हणतात. वेगवेगळ्या आजारांसाठी ही स्थिती पोषक असते. जसे की सर्दी-खोकला-तापासारखे श्वसनसंस्थेचे आजार , वेगवेगळे विषाणूजन्य आजार (viral infections) किंवा अपचन-आम्लपित्त- भूक मंदावण्यासारखे पचनाचे आजार, तसेच सोरायसिस-एक्झिमासारखे त्वचाविकार होताना किंवा आधीच झालेले असल्यास अधिक बळावताना दिसतात. हे त्रास होऊ नयेत किंवा आधीच असतील तर अधिक बळावू नयेत म्हणूनच नियमित ऋतुचर्या महत्वाची असते.  
                यासाठी काय टाळावे आणि कोणते नियम पाळावे हे पुढील तक्त्यात दिले आहे. 
             


पथ्यकर(खाण्याजोगे) पदार्थ 
अपथ्यकर (टाळण्याजोगे )पदार्थ 

धान्ये 
एक वर्षापेक्षा जुने धान्य 
( गहू,तांदूळ,ज्वारी,जव,नाचणी  ,बाजरी*), लाह्या 
नवीन धान्य.
उपवासाचे पदार्थ 
राजगिरा , 
शिंगाडा , साबुदाणा , शेंगदाणे 
डाळी 
मूग,मसूर,मटकी,कुळीथ , चवळी 
उडीद , छोले, राजमा 

भाजी 
पालक,तांदुळजा चवळई ,शेवगा , दूधी , भोपळा , शिराळे  , पडवळ परवल , मेथी, पतीचा कांदा,नवलकोल , सुरण 
भेंडी,तोंडली,बीट,शिंगाडा, कमलकंद , अंबाडी, 
फळे 
आवळा, पपई , डाळिंब , आंबे , भोकर , लिंबू,कोकम
कोहळा , सीताफळ , पेरू, हिरव्या सालीची केळी , ताडगोळे, पीच,सफरचंद, शहाळ्याचे पाणी 
दूध व दूधाचे पदार्थ 
दूध +सुंठ , दूध+हळद , ताक 
दही,चक्का ,पीयूष ,लस्सी श्रीखंड, पनीर, चीझ , मिल्कशेक्स , आईस क्रीम  
मांस** व मासे 
गावठी कोंबडी, बकरी 
गोड्या पाण्यातील मासे,बदक ,टर्की 
गोड  पदार्थ 
मध*** 
साखर , काकवी , गूळ , 
मसाले 
हिंग, पिंपळी,दालचिनी , लवंग,जिरे,धने, आले. 
काळे मिरे , लसूण ओवा
(मर्यादित प्रमाणात वापरता येईल.)
पाणी, इतर पेय
उकळलेले पाणी - निम्मे उकळलेले असल्यास उत्तम. या पाण्यापासून बनवलेली सरबते  
थंड पाणी,बर्फ , गार सरबते, रंग घातलेली विकतची सरबते


सध्या लॉकडाऊनमुळे थोडासा change म्हणून बऱ्याच जणी (आणि काही जणसुद्धा) छान-छान पाककृतींचे फोटोज शेअर करत आहेत. वेगवेगळी Challanges शेअर होत आहेत. 
चला तर मग आपणही एक challenge  करूया, “वसंत ऋतू रेसिपी Challenge.”
यात मी तुम्हाला challenge करतेय, वर लिहिलेल्या पदार्थांपासून एखादी छानशी पाककृती बनवा आणि share करा.

तळटीप -
* बाजरी - बाजरी हे धान्य मूलतः उष्ण गुणाचे आहे. त्यामुळे वसंत ऋतूमध्ये वापरताना देखील वातावरणातील उष्णतेप्रमाणे जपून वापर करावा. 

**मांस - मांस सेवन करताना शक्यतो भाजलेले Barbeque केलेले मांस निवडावे पण याला मसाला कमी लावावा. 

***मध - मध कफ कमी करणारा उष्ण गुणाचा  आहे. त्यामुळे गोडवा येण्यासाठी वापरता येतो. मात्र मध चुकूनही गरम करू नये.