Saturday, 5 October 2019

नऊ रंग नवरात्राचे...... स्त्रीशक्तीचे ..... आरोग्याचे......... या मालिकेतील लेख हा रक्ताल्पता याआजाराविषयी.....







नऊ रंग नवरात्राचे...... स्त्रीशक्तीचे ..... आरोग्याचे......... या मालिकेतील लेख हा रक्ताल्पता याआजाराविषयी.....

पण्डु रोग (रक्ताल्पता)

          रक्ताल्पता आणि स्त्री या विषयावर लिहीण्याआधी जरा या आजाराची भारतीय समाजातील सद्यस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर काही धक्कादायक माहिती मिळेल. काही अभ्यास सर्वेक्षणांनुसार भारतात अर्ध्याहून अधिक ( ५५-५९% ) स्त्रिया या रक्ताल्पता (Anaemia) या आजाराने ग्रस्त आहेत. म्हणजेच दर दोन स्त्रियांमधील एक स्त्री ही अॅनिमिक असते.
                आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर स्त्रियांचे हिमोग्लोबिन किमान १२ mg/dl असणे ही आहे आदर्श स्थिती पण बऱ्याच स्त्रियांमध्ये हे असते साधारण १०- ११.९ mg/dl च्या पातळीत, ज्याला कमी तीव्रतेची रक्ताल्पता (Mild Form Anaemia) असे म्हणतात. ( “बऱ्याच बायकांमध्ये असतं नं मग ठीक आहे,बघू नंतर”, हा संवाद याच स्टेजला ऐकायला मिळतो आणि खरं तर हाच दृष्टिकोन पुढे जास्त घातक असतो). त्यानंतर नंबर असतो यापेक्षा कमी म्हणजे ७ - ९.९ mg/dl Hb (हीमोग्लोबिन) असणाऱ्यांचा (Moderate form) आणि ६.९ mg/dl पेक्षाही कमी हिमोग्लोबिन असल्यास स्थिती गंभीर मानली जाते व या अवस्थेत तातडीचे उपाय आवश्यक असतात.

आयुर्वेदानुसार रक्ताल्पता - 

              आयुर्वेद शास्त्रामध्ये हा आजार पंडुरोग या नावाने वर्णन केला आहे. पंडु या शब्दाचा अर्थ आहे फिकटपणा . ------>  ज्या आजारात रुग्णाच्या त्वचा,नेत्र,नख या अवयवांच्या ठिकाणी पांडुता येते आणि रोगी केवड्याच्या कणसातील गाभ्याप्रमाणे फिकट आणि निस्तेज दिसू लागतो असा हा पंडुरोग या आजाराविषयी विस्तारपूर्वक सांगताना फक्त रक्ताल्पता हा एकच निकष न मानता इतर शरीरलक्षणेही विचारात घेतली जातात.  तसेच ओजक्षय ही संकल्पनासुद्धा सांगितली आहे. त्यानुसार अंग गळून गेल्यासारखे वाटणे, त्वचेवर कोरडेपणा जाणवणे,अशी लक्षणे सुरूवातीपासूनच जाणवतात. ( या लक्षणांना पूर्वरूपे असे म्हणतात. म्हणजे असे की या अवस्थेत आजाराचे व्यक्त स्वरूप दिसेलच असे नाही पण ही सुरूवात असू शकते.) यानंतर वेळेत औषधोपचार केले नाहीत तर अधिक तीव्र लक्षणे दिसू लागतात. भूक न लागणे, भ्रम(गरगरणे) ,श्रम (नेहमीचे काम करतानाही याआधी न जाणवलेला थकवा), दम-धाप लागणे, सर्वांग वेदना, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे, केस गळणे, छातीमध्ये धडधड-घाबरल्यासारखे वाटणे यापैकी काही अथवा सर्व लक्षणे आजाराच्या तीव्रतेनुसार दिसतात. अधिक तीव्र लक्षणांमध्ये त्वचा,नखे,डोळ्यांच्या ठिकाणि फिकटपणा येतो,हे अवयव निस्तेज दिसतात, स्वभाव त्रासिक-चिडचिडा होतो, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळल्यासारखे वाटते, अंगात बारीक ताप जाणवतो.

स्त्रियांमध्ये दिसणारे गंभीर परिणाम - 
             स्त्रियांमध्ये पंडुता अधिक तीव्रतेने दिसण्याची पुढील मुख्य कारणे आहेत.
  • मासिक पाळी - दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या काळात प्रत्येक वेळी साधारण ३० ते ४० मिली रक्तस्राव होतो होतो. (हे फक्त एका महिन्याचे प्रमाण आहे जे प्रकृतीनुसार कमी-जास्त असू शकते पण सरासरी काढली तर एका वर्षात साधारण 350-500मिली रक्तस्राव होतो. ) जर अंगावरुन जास्त जात असेल किंवा पाळी २१ दिवसापेक्षा कमी कालावधीत येत असेल तर हे प्रमाण अजून जास्त होईल. यामुळे रक्ताल्पतेची लक्षणे दिसतात.
                    पाळीवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊन पाळी अनियमित होणे,कमी प्रमाणात रक्तस्राव किंवा अधिक दिवस थोडे-थोडे अंगावर जाणे अशी लक्षणे दिसतात.
  • गर्भारपण - या काळात स्त्री दोन जीवांची असते.ज्यामुळे शरीरातील रक्त वाढते.(Hypervolemia- यात serum व plasma यांचे प्रमाण वाढल्याने रक्तकणांचे प्रमाण कमी होते.अशा वेळी मातेला ३०-६०mg लोह व ४००माइक्रोग्राम फोलिक ऍसिड मिळणे गरजेचे असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन चे प्रमाण वाढू शकेल. रक्ताल्पता असल्यास अपूऱ्या कालावधीत प्रसूतीचा धोका वाढतो, बाळाचे वजन कमी असणे,प्रसूतिच्या वेळी जंतुसंसर्गाचा धोका शक्यता वाढते.
भारतात शिक्षणाचा अभाव, वैद्यकीय सुविधांबद्दल अज्ञान,आर्थिक अडचणी,वारंवार होणाऱ्या बाळंतपणामुळे येणारा निष्काळजीपणा यामुळे गरोदरपणातील रक्तल्पतेचे प्रमाण अधिक आहे.
  • प्रसूती - एका प्रसूतिच्या वेळी साधारण 500-800मिली रक्तस्राव होतो. प्रसूतीनंतर रक्तस्राव (Post partum haemorrhage) झाल्यास हे प्रमाण वाढते व प्रसंगी मातेचा जीव धोक्यात येऊ शकतो.
  • अस्वच्छता <----> कृमि प्रादुर्भाव - स्वयंपाक बनवताना , जेवताना स्वच्छता न राखणे, अस्वच्छ भांडी-हात यामुळे कृमि संसर्ग होतो जे रक्तल्पतेचे मुख्य कारण आहे.
तसेच अस्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या anapheles डासांमुळे होणाऱ्या मलेरिया या आजारामुळेही रक्ताल्पता दिसून येते.
  • निकृष्ट दर्जाचे अन्न - सर्वसाधारण भारतीय घरात स्त्रिया व मुलींना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा मिळत नाही, तसेच परंपरागत विचारांमुळे त्या सुद्धा स्वतःचे स्थान कमी समजतात. त्यामुळे शिळे अन्न जेवणे, कुटुंबातील सगळ्यांना वाढल्यानंतर उशीरा जेवणे , उरलेल्या अन्नातच भूक भागवणे असे प्रकार घरा-घरांतून सर्रास दिसतात. अशा वेळी लोहाचा नैसर्गिक स्रोत असलेले सुकामेवा, डाळी, फळे, मांसाहार यांचे सेवन सगळ्यांना शक्य होत नाही त्यात स्त्रियांच्या वाटयाला त्याचा गरजेइतका भाग येईल याची शक्यता कमी असते. मुलांच्या पोषण -गरजा यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणारी आई स्वतःच्या आरोग्याकडे सहज दुर्लक्ष करते.

उपाय
  • आहार - आहारामधून मिळणारे लोह हे सौम्य रक्ताल्पता व हीमोग्लोबिनची पातळी नियमित ठेवण्यासाठी उपयोगी असते. पालक, बीट,टॉमेटो, डाळी, कडधान्ये, राजमा, चवळी यासारख्या भाज्या, मनुका, सुकामेवा, कलेजी, कोंबडीचे- बकरीेचे मांस,मासे यातून पुरेसे लोह मिळते.
  • औषधे - पंडु रोग चिकित्सा करताना फक्त रक्तवाढिसाठी लोह देणे पुरेसे नाही तर रसधातु पासून चांगला रक्तधातु तयार व्हावा यासाठी रक्ताग्निवर्धक  व रक्तधातु वर्धक अशी दुहेरी औषधयोजना करावी लागते. रक्तक्षय---> दुर्बलता---->धातुक्षय---->वातप्रकोप----> रुक्षता ,असे हे दुष्टचक्र आहे. यासाठी स्नेहन, मृदू विरेचन अशी पंचकर्म चिकित्सा करून नंतर पुनर्नवा मंडूर, नवायस लोह यासारखी औषधे  दिली जातात. औषध योजना करताना त्यासोबत फोलिक एसिड देतात ज्यामुळे लोहाचे शोषण वाढते. तोंडावाटे द्यायची औषधे मध्यम तीव्रतेच्या रक्ताल्पतेसाठी उपयोगी असतात.
  • तीव्र रक्ताल्पता असल्यास इंजेक्शन्स किंवा blood transfusion केले जाते व त्यानंतर दीर्घ कालावधीसाठी गोळ्या दिल्या जातात.

टीप - मात्र लोहाच्या कमतरतेमुळे जसा रक्तल्पतेचा त्रास होतो तसेच अति लोह सेवनाने विषाक्तता (लोहाचे शरीरावर दिसून येणारे विषारी परिणाम) दिसून येतात. प्रस्तुत लेखामध्ये व्यक्त केलेली मते ही सामान्य वाचकांच्या माहितीसाठी आहेत. त्यामुळे डॉक्टर नसताना स्वतःच स्वतःवर प्रयोग करु नये वैद्यकीय सल्ल्यानेच औषधे घ्यावित.

Sunday, 1 September 2019

गणेशोत्सव, उकडीचे मोदक आणि आयुर्वेद


गणेशोत्सव, उकडीचे मोदक आणि आयुर्वेद


                                                                छायाचित्र सौजन्य सौ. मधुरा पोडूवाल


घरी गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु होती. अनया आजीला म्हणाली, "आजी गं, यावर्षीही नैवेद्याला उकडीचेच मोदक करूया. मला,नीलला, आरवला,श्रीयाला सगळ्यांनाच आवडतात, मऊ मऊ मोदक आणि गणपती बाप्पालासुद्धा…. पण आजी बाप्पाला मोदकच का गं आवडतात?"
आजी म्हणाली, " एकदा काय झालं,गणेशाचे परशुरामाशी युद्ध झाले आणि तेव्हा बाप्पाचा एक दात तुटला. या तुटलेल्या दातामुळे त्यांना काही खाता येईना म्हणून मग बाप्पासाठी मऊ मोदक बनवण्यात आला. हा पदार्थ खाल्ल्यावर गणरायाला त्याची चव खूप आवडली आणि ते आनंदित झाले.म्हणून या पदार्थाला मोद(आनंद ) देणारा असा, मोदक असे नाव मिळाले."
"पण मग आज्जी,मोदकच का? श्रीखंड, पुरणपोळी किंवा केक का नाही?"
"त्याचं काय आहे…" एवढा वेळ त्या दोघींच्या गप्पा ऐकत असलेली स्निग्धा मावशी म्हणाली, "उकडीचे मोदक बनवण्यासाठी वापरतात, ओलं खोबरं, गूळ, जायफळाची आणि वेलचीची पूड,केशर आणि तांदळाचे पीठ. यातील तांदळाच्या पिठीची छान,मऊ उकड बनवून बाहेरचे आवरण बनवतात. तांदुळ मुळात पचण्यास हलके, त्यात उकड काढताना झालेल्या अग्निसंस्कारामुळे(उकड काढण्याच्या प्रक्रियेत पिठावर होणारी अग्नीची क्रिया) ते अधिक पथ्यकर बनते. शिवाय तांदुळ मधुर रसात्मक असून शक्तिवर्धन करणारे आहे, ओलं खोबरं चवीला गोड, गुरु गुणाचे(पचावयास जड), स्निग्ध, पौष्टिक आणि वात व पित्त कमी करणारे आहे तसेच शरीरातील दाह, तहान कमी करणारे, बल देणारे, केसांसाठी हितकर, कान्ति वाढवणारे आहे. त्यासोबत वापरला जाणारा गुळ हा सुद्धा उत्तम कफ-वातशामक,गुरु गुणाचा(पचायला जड), अग्निवर्धक, पौष्टिक, उष्ण, श्रम-थकवा कमी करणारा आहे. गूळ जेवढा जुना तेवढा वापरायला चांगला. वेलची आणि जायफळ हे फक्त सुगंधासाठी किंवा स्वादासाठीच नाही तर पचनासाठी, अजीर्ण, पित्त, सर्दी-पडसे यासारख्या आजारांवर गुणकारी आहे, तसेच पाचक गुणांचे असल्याने गूळ-खोबऱ्याचे सारण पचवण्यासही मदत करते. त्यात घातलेले केशरसुद्धा वातशामक, दीपक(पचनशक्ती वाढवणारे),
असा हा मोदक पुन्हा उकडल्यामुळे अजून चवदार, पौष्टिक आणि पचण्यास हलका बनतो."
"आणि मावशी ह्या गरमागरम मोदकाची शेंडी मोडून त्यात तूपाची धार धरुन खायला कित्ती मज्जा येते गं…"
"हो तर, आणि अनया, तूपसुद्धा विशेषतः गाईच्या दुधाचे लोण्यापासून कढवलेले तूप हे बुद्धि, कांति, स्मृति वाढवणारे, बल्य, वात-पित्त कमी करणारे, थकवा घालवणारे आहे. जठराग्नि वाढवून, वीर्यवर्धक, दृष्टिला हितकर, शरीराला स्थैर्य, बळकटी देणारे असं आहे."
"काय अनया, कसल्या गप्पा चालल्यात?" , आईने आत येत विचारले.
"अगं आई, स्निग्धामावशी सांगत होती आयुर्वेदात उकडीच्या मोदकाबद्दल काय सांगितलं आहे."

"अच्छा, काय सांगितलंय मग?"

मग स्निग्धा थोडक्यात सांगू लागली, "श्रावण-भाद्रपद महिन्याचा काळ म्हणजे वर्षा ऋतू. या काळात पावसामुळे गारवा वाढलेला असतो.शरीरात वात दोषाचा प्रकोप झाला असल्याने रुक्षता,क्लम(थकवा), वाताचे आजार वाढलेले असतात.अश्या वेळी येणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक केले जातात. हे मोदक चवीला गोड असल्याने पौष्टिक, उत्साह वाढवणारे, शुक्रल, आणि वातशामक, अस्थि व मांस धातूला बल देतात. मनाला आनंद देणारे आहेत. मुख्य म्हणजे वातावरणातील बदलांमुळे बिघडलेल्या शारिरीक संतुलनाचे, आपल्या स्निग्ध,किंचित् उष्ण, वातघ्न व कफकर गुणांनी नियमन करतात."
मग आजी म्हणाली, " उकडीच्या मोदकाप्रमाणे तळणीचे मोदक हे कणकेपासून बनवतात. यात ओले खोबरे-गूळ /ओले खोबरे-साखर / सुके खोबरे-पिठीसाखर असे सारण असते. म्हणजे सुकं खोबरं किसून ते थोडंसं भाजून घेऊन त्यात पिठी साखर, भाजलेली खसखस, चारोळी, सुका मेवा, वेलदोडा पूड वा पंचखाद्य घालून सारण तयार करायचं आणि कणिक भिजवून त्याची लाटी करून त्यात हे सारण भरून मोदक करायचे आणि तेलात वा तुपात तळायचे."
"अरे वाह, मग या गणपतीत आपण छोटा भीम सारखी मोदक खाण्याची स्पर्धा ठेवू,११-२१ किंवा ५१????"तेवढ्यात धावत आलेल्या नीलने सूचना केली.
"अहो छोटे भीम,मोदक पचायला जड असतात बरं, आणि आपण काही बाप्पा नाही एवढे मोदक एकाच वेळी फस्त करायला.त्यामुळे पोटाची काळजी घेऊन आवडतील तेवढे मोदक खा,पैज लावून नको."
हे ऐकून सगळी वानरसेना एकसाथ ओरडली…
"गणपति बाप्पा मोरया…."

लेखिका-
वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक.
समन्वय आयुर्वेदिक व पंचकर्म क्लिनिक.
बोरीवली, मुंबई.
9870690689
प्रस्तुत लेख शेअर करायचा असल्यास लेखिकेचे नाव पत्त्यासहित शेअर केल्यास हरकत नाही.








Wednesday, 7 August 2019

स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन भाग २







स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन 
         (वर्ल्ड ब्रेअस्टफीडिंग डे - जागतिक स्तनपान सप्ताह २०१९)





या  भागामध्ये आपण आयुर्वेदीय संहितांमध्ये सांगितलेले स्त्रीदुग्ध म्हणजेच स्तन्याचे गुण  पाहणार आहोत. सुश्रुत संहितेत सांगितले आहे कि स्तन्य परीक्षा पाण्यामध्ये करावी. ही अत्यंत साधी परीक्षा असून घरच्या  घरी करता येते. काचेच्या भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात स्त्रीदुग्धाचे काही थेंब  टाकून बघितले जातात. 

शुद्ध स्तन्य लक्षणे -
  1. शुद्ध स्तन्य शीतल , अमल (स्वच्छ - clear ), तनु (पातळ), शंखाच्या वर्णनाप्रमाणे शुभ्र, पाण्यात टाकल्यावर पूर्णपणे मिसळून जाणारे असावे. 
  2. दुध फेसाळलेले नसावे. 
  3. त्यामध्ये तार  दिसून येऊ नये. ( दोन बोटांच्या चिमटीत दुधाचा थेम्ब दाबून बीट विलग केल्यावर तार  येते का, ते पाहावे.)
  4. दूधाचा  थेंब  पाण्यात अलगद टाकून बघितल्यास तो तरंगणारा किंवा बुडणारा  नसावा. पाण्यात सहज मिसळून जावा.  
  5. तसेच आईचे दूध नियमितपणे पिणाऱ्या बाळांची शारीरिक व मानसिक वाढ उत्तम होते. (पुष्टीकर आरोग्यकर: च इति )
  6. बाळाला तसेच आईला स्तन्यामुळे काहीही त्रास होत नाही.  (शिशु: धात्र्यो: अनापत्ति )
अशुद्ध  स्तन्य लक्षणे 
  1. स्तन्य अधिक मधुर रसाचे असल्यास बाळाला वारंवार आणि भरपूर शी-शू होते . (सध्या पावसाळ्यात सगळ्याच बाळांना वातावरणातील गारव्यामुळे वारंवार शू  होताना दिसते त्यामुळे मातांनी काळजी करू नये. पण बाळाच्या शू -शी कडे लक्ष द्यावे. )
  2. कषाय रसाचे स्तन्य असल्यास बाळाला कडक शी होते आणि शूसुद्धा कमी होताना दिसते. 
  3. वात -कफादी दोषांनी बिघडलेले स्तन्य असल्यास बाळाला उलटी-अपचनाचा त्रास दिसतो. 
अश्या वेळी आईला आहार-विहार नीट समजून घेऊन त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात व वैद्यांच्या सल्ल्याने आईला औषधे देणे गरजेचे असते. 


खालील तक्त्यामध्ये मातृस्तन्य , गायीचे दूध व बाजारात उपलब्ध असलेले फॉर्म्युला  फीड यांची तुलना दिली आहे . यावरून लक्षात येते कि आईच्या दूधाला  पर्याय नाही व बाकीचे पर्यायांचा विचार आईचे दूध अगदीच उपलब्ध नसल्यास करावा हे योग्य . 


इतर लिंक - मागील दोन वर्षांपासून चालत आलेल्या या लेखमालेत स्तनपान या विषयावर वेगवेगळ्या पैलूने विचार करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे . ते लेख खालील लिंक वर  वाचा. 

१.  स्तनपानाचे महत्व https://samanwayayurved.blogspot.com/2017/08/blog-post.html

२. स्तनपानाची पद्धत  https://samanwayayurved.blogspot.com/2018/08/blog-post.html

३. ब्रेस्ट क्रॉल , बाळ अथवा आई आजारी असल्यास https://samanwayayurved.blogspot.com/2018/08/blog-post.html

Wednesday, 31 July 2019

स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन



        स्तनपान - आयुर्वेदीय दृष्टिकोन 
              (वर्ल्ड ब्रेअस्टफीडिंग डे - जागतिक स्तनपान सप्ताह २०१९)








               आई व बाळाचे नाते यावर सर्व भाषा-संस्कृतीमध्ये भरभरुन लिहिले- बोलले जाते.आई आणि बाळाच्या नात्याचा बांध हा स्तनपानामुळेही जास्त घट्ट होताना दिसतो . आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून आईचे दूध व स्तनपान, आई व बाळ दोघांसाठी महत्वाचे आहे.
             हे महत्व जगातील सर्व मातांपर्यंत पोहोचावे आणि जगभरातील प्रत्येक नवीन मातेला, मग तिचा आर्थिक स्तर-सामाजिक स्तर कुठलाही असो,तिला आपल्या बाळाला स्तनपान देता यावे यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या पहिल्या आठवडयामध्ये १९९१ सालापासून ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा केला जातो. स्तनदा माता व त्यांचे कुटुंबिय यांना स्तनपानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळून स्तनपानासाठी नवीन मातेला जास्तीत जास्त आधार मिळावा हाच यामागचा उद्देश आहे.
             याचसाठी  मागील दोन वर्षांपासून समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक सदर ब्लॉगद्वारे  लेखमाला प्रसारित करत आहोत. मागील दोन वर्षांत आपण प्रेमस्वरूप आई.... वात्सल्यरूप आई... या लेखामालेत स्तनपान , आहारशास्त्रीय महत्व (Nutritive value ), स्तनपानाची योग्य पद्धत , स्तनपानसाठी अर्ह-अनर्ह (Indications -Contraindications ), ब्रेस्ट क्रॉल पद्धत यांची माहिती पाहिली . यावर्षी आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून स्तनपान कसे असावे हे पाहणार आहोत. 
  1. धात्री  -  आयुर्वेदीय संहितांमध्ये सगळ्यात आधी धात्रीचे वर्णन आहे. धात्री म्हणजे बाळाची आई किंवा आईच्या अभावात बाळाला दूध पाजणारी स्त्री. पूर्वीच्या काळी  तिला दूधआई म्हणत. हल्ली याच प्रकारची संकल्पना ब्रेस्टमिल्क बँकच्या स्वरूपात पाहायला मिळते.  दोन्ही संकल्पनांमध्ये आईचे दूध मिळत नसल्यास बाळाला किमान स्त्रीदुग्ध मिळावे याचा प्रयत्न दिसतो. 
                       यासाठी सगळ्यात आधी बाळाच्या आईने/धात्रीने  कसे राहावे , हे सांगितले आहे. स्त्रीने आहार-विहाराचे पथ्य पाळावे. कारण चुकीचा आहार- विहार करणाऱ्या स्त्रीचे वातादि दोष कुपित होऊन स्तन्य दूषित करतात.  ज्यामुळे बालकांमध्ये काही आजार होताना दिसतात.याशिवाय धात्री ही मध्यमवयीन (साधारणतः २० ते ४५ वयाची), अतिकृश किंवा अतिस्थूल नसावी, अव्यसनी, शुचिर्भूत (स्वच्छतेचे नियम पाळणारी), अरोगा (निरोगी), वत्सल,आनंदी  व प्रेमळ असावी. या सगळ्या नियमांकडे नीट लक्ष दिल्यास लक्षात येईल कि यामध्ये स्वच्छता, शारिरीक  व मानसिक स्वास्थ्य यावर जास्त भर दिला आहे.  
  2. स्तन्यानाश (दूध कमी होणे) कारणे  - क्रोध, शोक, अवात्सल्य(lack of love for child ) , कुपोषण ही कारणे  दूधाचे स्रवण कमी करणारी ठरू शकतात असे आचार्य सांगतात . आधुनिक संशोधनाद्वारे सुद्धा  हे  सिद्ध  झाले आहे की Oxytocin आणि prolactin  ही  संप्रेरके आणि स्तनपानाची मुख्य प्रक्रिया (let down  reflex ) यामध्ये मातेच्या भावना महत्त्वाच्या असतात.तसेच नकारात्मक-दुःख्खी  विचार करणाऱ्या स्त्रियांच्या स्तन्यातील IgA  या इम्युनोग्लोब्युलिनचे प्रमाण कमी असते. यामुळे आयुर्वेदीय संहितांमधील दावे योग्य असल्याचेच सिद्ध होते. 
  3. मातेने करावयाचे पथ्य - यासाठी मातेने पुरेशी विश्रांती घ्यावी. मन प्रसन्नचित्त ठेवावे.रोज संपूर्ण अंगाला मालिश करून शेक घ्यावा.  आहारात गहू,ज्वारी, साठेसाळी किंवा तांदळाची उकड काढून केलेली भाकरी, शिंगाड्याचे पीठ,खोबरे (ओले किंवा सुके), अहळीव , तीळ, दुधी भोपळा , पडवळ, शिराळे ,हिरवे मूग, मुगाची डाळ, शेवगा,सुरण, कच्ची केळी , मसाल्याच्या पदार्थांत लसूण , जीरे ,धणे, काळे मिरे,दालचिनी,खसखस,शेपा  , खारीक ,खजूर, अक्रोड,बदाम  यासारखा सुकामेवा , शतावरी ,ज्येष्ठमध, विदारीकंद  यासारखी द्रव्ये आहारातमोठ्या प्रमाणात वापरावी. 


(क्रमशः )

               

Wednesday, 20 March 2019

*Holi tips for Skin & hair*



*Samanwaya Ayurveda's*☘
*Holi tips for Skin & hair*

               The nation is gearing up to celebrate one of their most loved festivals, Holi.
             Also called the festival of colours, Holi is one of the most widely celebrated festivals of the subcontinent.
            We have all the tips and tricks you would need for your beauty needs.

*#Keshayurved* *#Samanwaya Ayurveda*

1. Hair-care
◆On the day of Holi, make sure you massage or oil your hair from the roots with coconut oil
◆ Tie your hair in a braid or bun to avoid maximum damage.Brush off the dry colors that must have been accumulated in your hair. Stand under running water for 10 minutes and let the colors wash off from your hair.
 Gentle rub on the scalp is good to loosen up the formation of clots blocking the pores.

To get rid of wet colors, first rinse hair thoroughly with cold water . You can then apply a homemade mask..

1/2 tbsp. olive oil

1 tbsp. coconut oil,

1 tsp honey

1 tsp yogurt.

Make a fine paste by blending all ingredients, apply it on your scalp and hair and leave it for an hour. Then, wash it off. This will deeply condition your hair. Use natural cleanser shikakai.ritha.

*#Keshayurved* *#Samanwaya Ayurveda*

2. Skin Protection
◆On the day of Holi, make sure you apply almond oil all over your body. Especially, on the parts that are most exposed. Oiling the skin prevents colours from sticking to the body, and makes it easier to rinse off the colours post the play. In addition to this, almond oil is also a rich source of vitamin E and provides nourishment to the skin.

◆Face masks
You can use chandan + dahi face mask.
Chandan + cucumber juice face mask works best on colour allergies.
Aloevera gel is also useful for cooling effect.
Avoid using soaps or face-wash as they are alkaline in nature and will dry your skin more.
Using banana peel - you can rub inner surface of banana peel to remove excess colour.

*Happy & safe holi*🍂
*Eco friendly holi*🌸🍃

*for More info contact*--
*Dr Snigdha Churi-Vartak*
Samanwaya Ayurveda And panchakarma clinic.
*Authorized Keshayurved Branch*
(India's first ISO certified Ayurvedic hair testing lab)
*9870690689*

Tuesday, 7 August 2018

प्रेमस्वरूप आई .... वात्सल्यरूप आई....... - भाग 3







  • ब्रेस्ट क्रॉल - प्रसूती झाल्यावर बाळ रडले व श्वासोच्छवास सुरू नीट सुरु झाला की लगेच बाळाला कोरडे करावे. आणि साधारणतः आई प्रसूतीनंतर आडव्या स्थितीत असते अश्या स्थितीत आईच्या पोटावर दोघांचा एकमेकांना पूर्ण स्पर्श होईल अश्या रीतीने बाळाला उपडे ठेवावे.या अवस्थेत बाळाचे डोके आईच्या स्तनांमध्ये येते . आईने हलकेच बाळाला पकडावे , बाळाचे नाक दाबले जात नाही ना याची काळजी घ्यावी . बाळाला टोपी घालावी , आई-बाळाला एकत्रित पांघरूण  घालावे म्हणजे बाळ उबदार राहील व आई-बाळाचा एकत्रित स्पर्श होत राहील. असे ठेवल्यावर जवळ जवळ सर्वच बाळे आपणहून स्तनाकडे सरकतात व स्वतःहून स्तनपानाची सुरुवात करतात. यालाच ब्रेस्ट क्रॉल असे म्हणतात. या पद्धतीने साधारणतः अर्ध्या तासाच्या आत स्तनपानास सुरुवात होते . ब्रेस्ट क्रॉल ही पद्धत बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी लाभदायक ठरते.
  • आई आजारी असल्यास - नेहमीचा  साधा आजार असल्यास डॉक्टरी सल्ल्याने स्तनपानास अडथळा न आणणारी औषधे घेऊन स्तनपान करता येईल.
मात्र HIV संक्रमित  किंवा अंमली पदार्थच्या व्यसनाधीन मातेचे दूध बाळाला देऊ नये.
किमोथेरपि किंवा रेडिएशन थेरपी चालू असल्यास बाळाला स्तनपान करू नये.
TB चे संक्रमण असल्यास सुद्धा डॉक्टरी सल्ला घ्यावा..
  • बाळ आजारी असल्यास - या उलट बाळ आजारी असल्यास त्याची पचनशक्ती मंदावते अशा वेळी त्याला बाहेरचे अन्न  पचायला जाड जाते. त्यामुळे आजारी बाळाला जरूर स्तनपान करावे. नियमित स्तनपान केल्यास बाळाला नवजात कावीळ  (physiological jaundice ) होत नाही अथवा झाल्यास ती लवकर बरी होण्यास मदत होते.
  • भेगाळलेली स्तनाग्रे असल्यास बाळाला दूध पाजताना मातेला वेदना होतात त्यामुळे स्तनपानाच्या अडथळा होऊ शकतो अशा वेळी स्तनाग्रांना इतर कोणतेही क्रीम न लावता स्तन्यच लावावे , तसेच पाजताना खूप वेदना होत असल्यास स्तन्य काढून पाजावे व लवकरात लवकर भेगा भरून येतील असे पाहावे.
  • दाटलेले स्तन  - वेळीच स्तन्याचा निचरा , बाळास दूध पाजणे किंवा काढुन ठेवणे , न झाल्यास आईच्या स्तनांत दूध दाटते. जर त्यावर वेळीच उपचार नाही केले तर संसर्ग होऊन ताप येऊ शकतो त्यामुळे शक्यतो दूध दाटणार नाही असे पाहावे व तसे झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • बाळाला पुरेसेस दूध मिळते कि नाही हे पाहण्याचे निकष म्हणजे बाळाची शी , शू  व वजन.
शी - जन्मल्यानंतर बाळाला २४ तासांत पहिली शी होते त्यांनतर ते रोज कधी कधी दिवसांतून २-३ वेळा अथवा दार स्तनपानानंतरही  शी करू शकते तसेच याउलट काही बाळे २-३ दिवसांतून एकदा सुद्धा शी करतात. हे सर्व सामान्य आहे
शू  - बाळास जन्मानंतर ४८ तासांच्या आत पहिली लघवी होते.  व पूर्णपणे स्तनपानावर अवलंबून असलेले बालदिवसभरात कमीत कमी ६-७ वेळा लघवी करते .
वजन - शी व शू  याबरोबर पहिला जाणारा महत्वाचा निकष म्हणजे वजन . पहिल्या ५-७ दिवसांत बाळाचे वजन जन्माच्या वेळेच्या वजनापेक्षा ५-१०% नी  कमी होऊ शकते. त्यांनतर साधारणतः दररोज सुमारे २० ग्रॅम म्हणजे महिन्याला ५००ग ग्रॅम वजन वाढते . पहिल्या ५ महिन्यांत बाळाचे वजन हे जन्माच्या वेळेच्या दुप्पट आणि पहिल्या वाढदिवसापर्यंत ते तिप्पट होते. अर्थात थोडा फेरफार असू शकतो.


तर  संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या लेखमालिकेत आपण स्तनपान या विषयाबद्दल आवश्यक ती माहिती व स्तनपानाचे महत्त्व  जाणून घेतले. स्तनपान हा बाळाचा मूलभूत हक्क आहे , ती बाळाची गरज आहे त्यामुळे घरातील सर्वांनी याचे महत्त्व  जाणले पाहिजे. पहिल्या मुलाच्या वेळी यातील बऱ्याच गोष्टी पाळल्या जातात . पण पुढील प्रसूतीच्या वेळी सुद्धा या बाबी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. विविध समाज घटकांत , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही  सोया मिळावी यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे असते. हा संदेश या लेखमालेद्वारे मिळावा अशी इच्छा होती. स्तनदा मातेचा आहार हा विषय विस्तारभयास्तव इथे घेतला नाही. पुढील काही दिवसांत त्यावर स्वतंत्र लेख लिहिण्याचे योजिले आहे. आपल्याला ही मालिका  माहितीपूर्ण वाटली असेल अशी अशा आहे . आपले काही प्रश्न असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये आवर्जून विचारावेत.

Breastfeeding - Foundation of LIfe , Part 3












  • Breast Crawl - It is an ability  by which Every Newborn when placed on mothers abdomen, soon after birth, is able to make there way to mother's breast for feeding.  This instinct driven effort is known as ‘Breast Crawl’.
This can  be initiated by placing a baby , after regular breathing is confirmed, on his mother’s chest while mother is lying in natural laid back position. Here baby’s head lies between mother’s breasts. In this position , mother can make sure that baby is stable and doesn’t roll off.  Mother and her baby should be covered in same blanket to keep them warm and in each others touch. This helps to create bond of love. Within a hour, Breastfeeding can be introduced naturally with this method. Breast crawl is also important for infant’s physical and mental development.
  • Breastfeeding should be avoided
  • if mother has HIV infection
  • If mother under any influence of narcotic drugs.
  • If mother is under chemotherapy or radiation.
  • And In case of tuberculosis infection, under medical advice should be seeked.

  • Unwell baby -  A mother must  feed her baby even if it is unwell as it has low digestive power nad loss of appetite. Cooked food or top feed is difficult to digest. Hence for younger children exclusive nursing is strongly recommended. Also feeding is proven beneficial in order to give protection or faster recovery from neonatal jaundice.
  • Cracked nipples - can be very painful while feeding baby and can be a hindrance during feeding process. It can be healed by applying breast milk regularly. No other cream/ointment should be used. If mother has severe pain , she can express milk manually for feeding.
  • Breast Engorgement - is a condition where breasts gets swollen and painful due to overproduction of milk. Engorged breast can be tight,hard and painful if not drained on time. Swelling may go upto armpit. If left untreated it may get infected and cause fever and even may lead to an abscess. So it is important to keep draining breasts. Most easy and important way of doing it to feed your child frequently and as soon as possible. Manual expression is also a convenient method and expressed milk can be stored as per requirement. Check for baby’s latching position. Massage breasts before each feeding to express more milk. Use cold compression. In case pain increases consult your doctor for the treatment.
  • As mentioned earlier , criterias to know if infant is getting enough breast milk are baby’s satisfaction,weight , urination and and stools (potty).
  • Stools (potty) - infants pass first stools within 24 hrs of birth. And after that  once a day. But sometimes baby may pass stools 2-3 times a day or may be once in 2-3 days. These conditions are normal and do not need any urgent medical attention.
  • Urination - first urine should be passed within 48 hrs of birth. After that baby wets at least 6-7 diapers when it is solely dependent on breastfeed.
  • Weight -  baby continues to gain weight after gaining back the weight she initially lost after birth. (Most babies lose up to 7 percent of their birth weight and then regain it by the time they're about 2 weeks old). Generally an infant gains 20 gms of weight everyday. ie 500 gms per month. Baby roughly doubles its birth weight by the age of five months and triples  by the first birthday.

This entire week, we had tried to explain importance of breastfeeding. Everyone in the household must understand that breastfeeding is fundamental right of every infant and it is their basic need as well. Many a times these things are followed during first pregnancy and ignored in later pregnancies due to burden of work, when they are much needed. Society and employers should support economically backward class of community. We hoped to convey this message through this article series. Diet for lactating mother have not been discussed over hereas this could be a subject for entire full length article. Any comments and queries  are welcome.
Thank you.


References -

  1. . Breastfeeding Promotion Network , India
  2. Textbook of obstetrics
  3. Picture reference - World Alliance of Breastfeeding Action (WABA) official website