Friday, 29 April 2016

डालडाचे खाणार त्याला......

        

      डालडाचे खाणार त्याला......
           

              दर वर्षी उन्हाळा सुरू झाला की सर्व social media वर एक मेसेज फिरायला लागतो तो म्हणजे डालडा पासून बनवलेले Ice Cream. पहिल्यांदा हा मेसेज वाचणारा माणूस एकदम शहरतोच. "ई sss , शीssss, नकोच ते Ice Cream" अशा सगळ्या प्रतिज्ञा होतात. पण मग उन्हाळा आहे आणि ice cream नाही खायचं म्हणजे कसं? मग अमूक एका कंपनी ऐवजी दुसऱ्या तमक्या कंपनीचे दुधापासून बनवलेले ice cream पण डालडावाले Ice Cream नकोच हे सर्वानुमते ठरते.

पण हे एवढे पुरेसे आहे का? इतर कितीतरी मार्गांनी आपण या विषारी डालडाचे सेवन करत आहोत.

          काय आहे हे डालडा??? खरे तर डालडा हे ब्रँड नेम आहे या पदार्थाला म्हणतात वनस्पतीजन्य खाद्य तूप थोडक्यात 'वनस्पती.' आपण जे तेल स्वयंपाकासाठी वापरतो ते जर जास्त काळ राहिले तर त्यावर हवा आणि प्रकाशाची रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यामुळे त्याला एक विशिष्ट चव आणि वास येतो यालाच खवटपणा किंवा Rancity म्हणतात.असे तेल मग स्वयंपाकासाठी वापरले जात नाही.त्यामुळे उत्पादकांचे नुकसान होते.हे टाळण्यासाठी 20व्या शतकात तेलावर Hydrogenation ही प्रक्रिया केली जाऊ लागली.यामुळे ही पातळ तेले घट्ट,टिकाऊ, वास न येणारी आणि वाहतुकीला सोयीची झाली. या सर्व कारणांमुळे हे वनस्पती खूप लोकप्रिय झाले. Margarine हासुद्धा वनस्पती चा भाऊच. त्यात भर म्हणून याला म्नाव दिले वनस्पती तूप यामुळे लोकांचा गैरसमज झाला आणि एवढे स्वस्त "तूप" म्हटल्यावर रोजचे जेवण,तळण, पक्वान्ने एवढेच काय लोक दिवाळीचा फराळसुद्धा डालडामध्ये बनवू लागले. (दचकलात ना?डालडामध्ये बनलेले रवा-बेसनाचे लाडू,करंज्या आणि चकल्यासुद्धा.. मीसुद्धा एका रुग्णाकडून हे सर्वप्रथम ऐकलं तेव्हा अशीच दचकले होते)

             या वनस्पतीचे शरीरावर काय घातक परिणाम होतात ते जरा पहा -

- वनस्पतिज तूप शरीरातील वाईट Cholesterol (LDL) वाढवते आणि चांगले Cholesterol (HDL) कमी करते.

- या वनस्पतिज तूपातील घटक रक्तवाहिन्यांच्या अंतःत्वचेमध्ये साचून राहतात ज्यामुळे धमनीप्रतीचय (Coronary artey blockeges) , हृद्रोग, उच्च रक्तदाब, Hyperlipidemia (वाढलेलं Cholesterol) यासारखे आजार दिसून येतात.

- शरीरामध्ये Inflammation म्हणजे पेशींना आलेली सूज कमी करण्यासाठी जी रसायने आवश्यक असतात ती तयार होण्यास बाधा आणते.

- Hyperallergy म्हणजेच प्रत्युर्जता वाढवते, यामुळे शरीरावर पुरळ , कंड ,लालसर चट्टे उठणे असे त्रास दिसून येतात

             पण सध्या या वनस्पती विरोधात बराच गदारोळ झाल्यामुळे जेवणात होणारा वापर तरी बऱ्याच प्रमाणात कमी झाला असला तरी पुरता हद्दपार नाही, कारण आपण अजूनही पुरेसे जागरूक नाही.

               वनस्पती तूप, Hydrogenised oil , trans fat हे एकमेकांचे प्रतिशब्द आहेत आणि हे हमखास मिळण्याची जागा म्हणजे

- तयार खाद्यपदार्थ. बाजारातले Ready to eat food, बिस्किटस्, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ (processed food)

- Bakery पदार्थ म्हणजे खारी, बटर, नानकटाई, केक्स

- तळलेले फ्रेंच फ्राईज,नाचोज

- Butter जो बटर ही नही किंवा बटर से बेटर च्या नावाने विकले जाणारे table margarine (यात खूप मखलाशीने हे butter नाही असे सांगतात पण हे margarine म्हणजे बटर पेक्षा जास्त धोकादायक आहे हे सांगत नाहीत.)

- Eggless cake म्हणून विकताना वापरले जाणारे फॅट,क्रीम किंवा फ्रॉस्टिंग

- टपरीवाले, हलवाई , कॅन्टीनवाले, लग्नादी समारंभाची जेवणे बनवणारे आचारी हे सगळे खर्च वाचवण्यासाठी बऱ्याचदा वनस्पती वापरत असतात.

        त्यामुळे हे घातक वनस्पती जीवनातून पूर्णपणे हद्दपार करणे कठीण होऊन बसते परंतू या बाबत नीट माहिती असेल तर जागरूकपणे आपण त्याचा वापर कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो.


मूळ लेखिका- 

वै. स्निग्धा चुरी-वर्तक.

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

बोरीवली, मुंबई.

*9870690689*

(कृपया लेख फॉरवर्ड करताना मूळ लेखिकेच्या नावसाहित फॉरवर्ड करावा.आपल्या या छोट्याशा नैतिक कृतीने त्यांनी लिखाणासाठी केलेले श्रम सार्थकी लागतात.

धन्यवाद.

सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 13 एप्रिल 2022 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2016/04/blog-post_29.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत.)


 

Friday, 8 April 2016

गुढीपाडवा

                 आज चैत्र शुद्ध पाडवा म्हणजेच गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस.एका नवीन चैतन्यमयी उत्साहाची शुभ सुरुवात.भारतीय कालगणनेनुसार बघायचे झाले तर वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र - हा वसंत ऋतूचा काळ.  हेमंत-शिशिर ऋतूच्या थंडीमुळे शरीरात साचलेला कफ वसंत ऋतूच्या उष्णतेमुळे वितळून शरीरात कफ दोषांचा प्रकोप होतो.म्हणून या काळात कफाचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
                  प्रकुपित कफाचा इलाज करायचा असेल तर आयुर्वेदात शोधन कर्म - वमन सांगितले आहे.यामध्ये औषधी काढयाच्या साहाय्याने वमन करुन वाढलेला कफदोष काढून टाकला जातो. जेथे शोधन शक्य नसेल तिथे शमन कर्म सांगितले आहे.यामध्ये तोंडावाटे घ्यायची औषधे वापरुन इलाज करतात.
                  ही औषधे, "औषध" म्हणून न घेता सहज-सोप्या पद्धतीने घेतली जावी व रोजच्या दगदगीच्या जीवनात आजारांचा मुकाबला करण्याची ताकद यावी म्हणून सण आणि आरोग्य यांचा मेळ घातला जातो.जसे की आपण गुढीला कडुनिंबाची पाने-मोहोर,गूळ ,धणे यांचा नैवेद्य दाखवतो.
                यातील गूळ चवीला गोड, वात-पित्त शामक,कफ विताळवणारा, रक्त आणि मूत्र शुद्ध करणारा आहे.
धणे ज्वर,दाह,तहान कमी करणारे आहेत, चवीला कडू, वात-कफदोषनाशक आहेत.
कडूनिंब हे कडू चवीचे ,थंड, पित्त-कफदोषनाशक, पचन सुधारणारे, कृमिनाशक आणि रक्त शुद्ध करणारे आहे.
 म्हणून ही चटणी फक्त पाडव्याच्याच दिवशी नाही तर पुढेही सलग काही दिवस घ्यावी.त्यामुळे वसंतात होणारे कफाचे विकार आणि पुढे ग्रीष्मात उन्हाळ्यामुळे होणारे पित्ताचे - उष्णतेचे आजार कमी होण्यास मदत होईल.
                आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक ऋतू आणि हवामान बदलाच्या काळात सणांची योजना केली ज्यामुळे जीवनात आनंद येईल व या सणांच्या निमित्ताने त्या-त्या वेळी शरीराच्या स्थितीला पूरक घटकांचा नैवेद्य सुद्धा सांगितला म्हणजे त्याचे सेवन निश्चित होईल असे पाहिले.
आपणही या परंपरांचा मान राखून,त्यांचे पालन करुन जीवन आनंदी, आरोग्यदायी होईल असा प्रयत्न करु.
आपणा सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।।

Sunday, 28 February 2016

उपवासाचे शास्त्र



उपवासाचे शास्त्र 

                     उपवास हा शब्द 'उपविश ' या संस्कृत क्रियापदापासून बनला आहे. 'उप' म्हणजे जवळ आणि 'विश ' म्हणजे रहाणे /वास करणे. यामुळे उपवास या शब्दाचा अर्थ होतो शरीर - मनाने देवाच्या जवळ  रहाणे . व्यक्तीच्या कायिक-मानसिक शुद्धतेसाठी उपवासाची योजना केली गेली आहे . पण हल्ली उपवास म्हणजे अतिकडक अन्न-पाणी वर्ज्य करून (निर्जळी ) किंवा याच्या अगदि विरुद्ध म्हणजे 'एकादशी आणि दुप्पट खाशी' अशा चमचमीत प्रकारचे तरी असतात. या दोन्ही प्रकारात कसली आली आहे हो शुद्धता ?
                   परमेश्वराच्या जवळ जायचे, ध्यानानंदात तल्लीन व्हायचे तर शरीरात लाघव म्हणजेच हलकेपणा  आणि मनाला उत्साह हवा. 
 आयुर्वेदाचार्य चक्रपाणी म्हणतात ,
 उपावृत्तस्य पापेभ्यः सहवासो गुणैः सह ।
उपवासो  स विज्ञेयो न शारीरविशोषणम ।।
                    पापकर्मापासून दूर (निवृत्त) होऊन परमेश्वराच्या सहवासात राहणे. पुढे ते असेही म्हणतात उपवास म्हणजे शरीराचे  शोषण नाही . 
                    म्हणून उपवास करताना, मनाला चिंता,लोभ,मत्सर,दुःख यातून Break द्यायचा आणि देवाचे नाम-जप यात रमून जायचे आणि शरीराला - पर्यायाने पचन संस्थेला Break द्यायचा व पचायला हलके पदार्थ खायचे म्हणजे पचन सुधारते आणि सामता कमी होऊन शरीराला हलकेपणा (लाघव) येतो 
                      पण प्रत्यक्षात आपण काय करतो तर उद्या शिवरात्र-एकादशी-अंगारकी आहे मग , " सगळ्यांसाठीच नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी करू" म्हणून ढीगभर साबुदाणे भिजत घातले जातात. साबुदाण्याची  खिचडी-वडे ,वेफर्स,दाण्याची आमटी असे एकापेक्षा एक दणदणीत ,पचायला जड असलेले खाऊन आपण पचन संस्थेला अजून दमवून टाकतो आणि`मग अंग जड वाटणे , गॅसेस होणे, Hyperacidity, डोकेदुखी हे प्रकार सुरु होतात. त्यात अजून भूक दाबण्यासाठी म्हणून चहा-कॉफी चा मारा असतोच . मग सुरू होतात डॉक्टरांच्या वाऱ्या आणि ओरड सुरु होते कि हे उपास-तापास सोसत नाहित ब्वा  आपल्याला ……. 
खरं तर उपवास नाही तर उपवासाची चुकीची पद्धत सोसत नसते आपल्याला. मनाचं-शरीराचं न ऐकता फक्त जिभेचं ऐकल्याचा हा परिणाम असतो.
                    म्हणून उपवास करताना  पुढील पदार्थांचा वापर करावा . 

  1. सामान्यतः उपवासाचे पदार्थ हे पचायला हलके मात्र पचायला सोपी शर्करा असलेले (Simple  forms  of  sugars  such  as Glucose ,Fructose ) , Magnesium  असलेले असावेत जेणेकरून शरीराला  त्वरित उर्जा मिळू  शकेल. 
  2. चिक्की हा उत्तम पदार्थ आहे. यातील गूळ राजगिरा सुकामेवा हे पदार्थ त्वरित उर्जा देणारे , मिनरल्स आणि प्रमाणात स्निग्ध पदार्थ पुरवणारे असतात . 
  3. उसाचा रस हा बलकारक , तहान शमन करणारा ,मूत्र शोधन करणारा आणि थंड  आहे 
  4. शहाळ्याचे पाणी सप्तधातूवर्धक,थंड,तृष्णाहर असे असूनही  पचायला हलके तरीही दीपन करणारे आहे . 
  5. वेगवेगळ्या  प्रकारची ताजी आणि शक्यतो त्या ऋतुमानातील फळे चावून खावी . फळांचे रस घेतल्यास शरीराला आवश्यक चोथा फेकून दिला जातो आणि गरजेपेक्षा जास्तीची साखर शरीरात जाते म्हणून ते शक्यतो टाळावेत . 
  6. खजूर खारका , जर्दाळू,मनुका,बदाम,अक्रोड,चारोळी यासारखा सुका मेवा मात्र थोड्या प्रमाणात खावा . काजू,पिस्ते,शेंगदाणे टाळावे.
  7. प्रवासात असताना उपवास करायचा असेल तर आंबापोळी ,फणसपोळी ,कोहळ्याचा पेठा , चिक्की ,सुकामेवा खाता  येईल .
    रस्त्यावरचे Juices , कापलेली फळे खाऊ नयेत . 
  8. गायीचे दूध,ताक,साजूक तूप  वापरावे पण दूधापासून बनले आहेत म्हणून बासुंदी ,लस्सी, मिल्कशेक, श्रीखंड, पेढे, बर्फी किंवा पनीरचे पदार्थ खाऊ नयेत ते पचायला जड असतात . 
  9. वेगवेगळे कंद जसे कि शिंगाडा,सुरण, कंदभाजी ,रताळी , कोनफळ हे उपवासासाठी उत्तम, पण ते शक्यतो भाजून किंवा उकडून खावे , तळून  खाणे टाळावे . 
  10. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हॉटेलच्या Menu card वर, वेगवेगळ्या कूकिंग शोज मध्ये "उपवासाचा/ची/चे या विशेषणाने सुरु होणारे सर्व पदार्थ टाळावेत (उदा. डोसे,मिसळ,कचोरी,कटलेट ,सामोसे,कोफ्ते हे आणि  असे सगळेच, हल्ली पिझ्झा सुद्धा आला आहे बरं का.. )
शेवटी उपवास का आणि कशासाठी करायचे या मागची कारणमीमांसा लक्षात घेणे महत्त्वाचे  नाहीतर चवीसाठी खायचे असतील तर या पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी उपवासाचे निमित्त कशाला?
शेवटी आरोग्यासाठी , आनंदासाठी केलेला उपवास खरा,नाही का?

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 28 फेब्रुवारी 2016 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2016/02/blog-post.html?m=1

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)












































































Sunday, 7 February 2016

For your Eyes Only...

Eye care

                Nowadays cases of various eye complaints and disorders related to eyes have risen up. Overuse of smartphones , televisions, computers is attributing to these complaints. People can and are using their smartphones ,laptops,kindles,i-pads outside their workspace as well.It has added some extra stress to eyes which might have gotten some free time to rest.This stress is the root cause of various common and severe eye problems.
               Stressed eyes can be diagnosed with symptoms like eye fatigue , Watery- irritated eyes, dry eyes, eye pain, reduced vision. If ignored it can get more severe and cause headache, reduced or disturbed sleep patterns, loss of concentration and irritability.
                Hence taking good care of your eyes , nurturing them is important. But for that first we need to understand basic  anatomy (structure) of our eyes.


                An Eye is roughly spherical structure situated in an orbit and mainly consists of three layers.


  • Outer fibrous coat is sclera and te transparent cornea.
  • Middle vascular layer comprises of coroid,cilliary body and an iris.
  • Innermost sensory layer is formed by retina which is an extended layer of the optic nerve,which carries visual senses to the brain.
  •                  When light rays fall on the eye , they usually fall on cornea which then refracts light through pupil which then get focused through the lens and the aqueous humor to fall on the retina.
    Retina being light and colour sensitive,carries these nerve impulses to the brain via optic nerve. Thus enabling us to visualize.
                   
            Externally there are six accessory eye muscles which control eye movement, refer to this image.

                  

              According to Ayurveda 'Chakshurindriya (चक्षुरिन्द्रिय) is located at an eye. And it has prime function of Seeing, looking and observing (दर्शनम्) . But nowadays we have limited this capacity mainly to a near vision work e.g. reading, watching illuminated screens of mobiles,TVs,computers which has increased stress.
                To rectify these complaints, we need to incorporate few minor changes to our routine. first we will start with following exercises.

  • Take a 10 minutes break from work every 3 hours. Do various eye and neck exercises. (It can be done at your workstation itself.)
  • Squeeze both eyes tightly ,hold for few seconds and then reopen slowly. Repeat this procedure 3-4 times
    Close eyes , open and look at some near object ,at around 15-20 cms.
  • Repeat this process and look at some distant object
  • Splash normal tap water on eyelids keeping eyes closed.
  • Wash eyes before going to bed and after waking up in the morning.


           These procedures considerably reduce eye strain. But if problem persists, one can sought help of Ayurveda. Ayurvedic treatments chiefly include internal medicines and panchakarma which controls vitiated Vat Dosha,  regulates activity of Vat , pacifies Pitta Dosha  and removes excess of kapha dosha. Procedures like Tarpan ( Netra Basti) ,Nasya , Parishek , Dhara, Lepam, Bidalak and Basti kram are performed.

              At Samanwaya ayurvedic and panchakarma clinic , we have started ' Vagbhat Netra suraksha Program ' , which is an eye care program for everyone.
Key features of this program -
  • This is a very scientific and Customized program which caters every patients requirements.
  • It includes various combinations of eye exercises , oral medication, panchakarma and Dietary - routine corrections as per patients' complaints.
  • For which we take a detailed patient history and suggest individual based program features.
  • This is a weekly appointment based program where we give eye exercises for each week. Every week we progress to next set of exercises after evaluating earlier exercises.
  • For further information and to book your appointment kindly contact / message Samanwaya ayurvedic and panchakarma clinic. (Email drsnigdhapchuri@gmail.com )

Disclaimer - This article has first been published on date 07th February 2016 by Dr Snigdha Churi-Vartak on her blog http://samanwayayurved.blogspot.com   All rights to this article are reserved. Kindly ask for permission prior sharing and do share without changing any contents and original author's name and blog address.

Thursday, 14 January 2016

Significance of Tilgud for Makarsankranti

Significance of Tilgud for Makarsankranti




Today is a Festival of Makarsankranti/ Lohari and people are busy in buying kites,making Tilgud.This festival also brings health benefits. It signifies Uttarayana. i.e. The Sun travels to the northern hemisphere.which brings more light and energy to our part and also points to coming springs.But winter chills can still be felt. Environment is less humid which makes air dry. Even our body has to suffer from this dryness.
                  Hence to combat with effects of dryness we make Tilgud for this festival. Tilgud is prepared with basic ingredients like Til (sesame), Gud (Jaggery), Ground nuts and Dried Coconut.All these ingredients have various Ayurvedic health benefits.

Til(Sesame - Sesamum indicum) - sesame seeds are sweet to taste and bitter after digestion. These pacify Kapha-Vaat and mild aggravate Pitta. Create heat , Agnijanana (improves digestion), medhajanan (improves memory) , twachya (skin tonic), improve vigour and act as a hair tonic.

Gud (Jaggery) - it is Sweet to taste ( madhur rasa-vipaka) and pacifies Vaat-Pitta dosha. Jaggery prepared from Sugarcane molasses and free from any chemical actions (Organic) is alkaline in nature, creates mild heat, snigdha, clarifies urine and blood, generates fat (Medakar) , improves vigour and acts as an aphrodisiac.

Groundnuts - pacify Vaat but aggravate Pitta strongly hence to be consumed in moderate amount and to be avoided by Pitta prakriti ( people having pitta dominant Constitution of body)

Dried Coconut - it is Sweet to taste ( Madhur rasa-vipaki) , generates cooling effect (sheeta), pacifies n, Body Tonic ,Hair tonic and also acts as an aphrodisiac.
                   So it is easily understood that combination of these ingredients balances composition of Tridoshas in the body and gives strength. Hence we consume Tilgud during this season. we can also incorporate these ingredients in our daily diet in various other forms as well.
            So "Tilgud kha aani god-god bola."

To read this article in marathi, click here
http://samanwayhealth.blogspot.in/2016/01/blog-post_14.html

मकरसंक्रांत आणि तीळगुळाचे लाडू

मकरसंक्रांत आणि तीळगुळाचे लाडू




आज मकरसंक्रांत. आज घरोघरी तिळगूळ -हलवा बनवला जात असेल.पतंगबाजीची स्पर्धा असेल.मकरसंक्रांत म्हटली की तिळगूळ आलाच, काही घरांत गुळपोळी, गुळपापडी, तिळाच्या वड्यासुद्धा केल्या जातात.
मकरसंक्रांतिला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरु होते.म्हणजेच सूर्य आता उत्तर गोलार्धात संक्रमण करणार, अधिक प्रकाश-उष्णता घेऊन येणार याचे हे चिन्ह.येणाऱ्या वसंत ऋतूची चाहूल घेऊन येतो हा सण.असे असले तरी अजूनही थंडी असते.हवेत आर्द्रता कमी असल्याने कोरडेपणाही असतो.शरीरावरसुद्धा या कोरडया हवेचा परिणाम होतच असतो.म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या तिलगुळाच्या लाडवांचे आरोग्यदायी महत्व जाणून घेऊ.

तीळ (Sesamum indicum) - हे मधुर रस , तिक्त (कडू) विपाकी कफ-वात दोषाचे शमन करणारे आणि किंचित पित्तकर ,उष्ण गुणाचे आहेत. अग्निजनन (पचन वाढवणारे), मेधाजनन (बुद्धिवर्धक), त्वच्य (त्वचेसाठी गुणकारी), बलदायक, केशजनन करणारे आहेत.

गूळ (Jaggery) - गूळ मधुर रस-विपाकी, वात-पित्तनाशक आहे. उसाच्या काकवीपासून बनवलेला आणि रसायनांनी शुद्ध न केलेला (Organic) गूळ हा सक्षार (अल्कली गुणाचा), अल्प उष्ण , स्निग्ध, मुत्राशय आणि मूत्र शुद्ध करणारा,रक्तशोधक,मेदकर,बलदायी,वृष्य (शुक्रधातु वाढवणारा) , कृमिकर असतो.

शेंगदाणे (Ground nuts) - हे वातशामक परंतु अत्यंत पित्तवर्धक आहेत. त्यामुळे कमी प्रमाणात खावे. पित्तप्रकृतिच्या व्यक्तीने टाळलेलेच बरे.

सुके खोबरे (Dried Coconut) - हे मधुर रस-विपाकी,वात-पित्तशामक, थंड , गुरु (पचायला जड), वृष्य(शुक्रधातु वर्धक), पोषक आणि केश्य (केसांसाठी उत्तम) आहेत.
                 वरील सर्व घटक पहिल्यावर लक्षात येते की या पदार्थांमुळे वात-पित्त-कफ या त्रिदोषांचा  समतोल राखला जातो आणि शरीराला बळ मिळते.म्हणून तिळगुळाची योजना ही या गुणधर्माचा अधिकाधिक फायदा मिळावा म्हणून केली गेली आहे. त्यामुळे आपणही आपल्या आहारात तीळ , गूळ , खोबरे नियमित वापरावे.तिळाच्या वडया,गूळपापडी असे पोषक पदार्थ थंडीच्या दिवसांत खावे.
 "मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. तिळगुळ खा आणि गोड-गोड बोला."

To view this article in english click here
https://samanwayayurved.blogspot.com/2016/01/significance-of-tilgud-for.html?m=0 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 14 जानेवारी 2016 रोजी आपल्या 

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)


Friday, 8 January 2016

गाजराचे सूप

                               गाजराचे सूप

थंडीचे दिवस म्हणजे कफ दोष संचयाचा काळ.याच काळात थंडीमुळे वाताचे त्रासही दिसून येतात.पण याच दिवसांत शारीर बल अधिक असते.म्हणून अधिक पोषणमूल्ये असलेले पदार्थ आहारात असावेत व त्यांना व्यायामाची जोड द्यावी म्हणजे आरोग्यप्राप्ति (Fitness) होईल. सध्याच्या थंडीच्या दिवसांत शरीर आणि मनाला तरतरी यावी म्हणून हे सूप करून पहा..



साहित्य -

गाजरं - 2 मोठी
कांदा - 1 मध्यम
टोमॅटो - 1 मध्यम
पाणी - 3-4 बाउल
कोथिंबीरीचे देठ 8-10
आले - 1 टेबलस्पून बारीक कापलेले
काळी मिरी - 10-12
तमालपत्र - 2
मीठ चवीनुसार

कृती -

1. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गाजराचे तुकडे , कोथिंबीरीचे देठ , बारीक कापलेले आले एक तमालपत्र आणि 7-8 काळी मिरीचे दाणे घालून शिजत ठेवावे.
2. दुसऱ्या भांड्यात तूप गरम करुन त्यात एक तमालपत्र , 2 मिरीचे दाणे घालून एक मध्यम कापलेला कांद गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
3. पहिल्या भांड्यातील गाजर शिजत आले की त्यात एक मध्यम टोमॅटो कापून घालावा व शिजेपर्यंत उकळू द्यावे.
4. शिजलेले मिश्रण गाळून घ्यावे व भाज्या आणि परतलेला कांदा मिक्सरच्या भांड्यात काढून थंड होऊ द्यावा. (त्यातील तमालपत्र काढून घ्यावे तसेच गाळलेले पाणी फेकू नये.)
अवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्यावे.
5. या पेस्टमध्ये आधी गाळून घेतलेले पाणी घालून मिश्रण पुन्हा गॅसवर ठेवावे आणि त्यात चविनुसार मीठ आवश्यकता वाटल्यास किंचित साखर घालावी.
6.आवडीप्रमाणे सूपचा दाटपणा कमी-जास्त करुन एक उकळी घ्यावी.

टीप -

- टोमॅटोचा वापर आपल्या चविप्रमाणे करावा.टोमॅटो न घालता फक्त गाजराचे सूप केल्यास तेसुद्धा छान लागते.
- सूप creamy व्हावे म्हणून ते गाळून घेतले जाते तसेच त्यात क्रीम किंवा दही घातले जाते.
पण पेस्ट पुन्हा गाळल्यामुळे त्यातील आरोग्यासाठी चांगले असणारे तंतुमय पदार्थ ( Fibers) काढून टाकले जातात.
तसेच दही किंवा क्रीम वापरणे हे विरुद्ध संयोग आहे त्यामुळे ते टाळावे.

गुणधर्म

गाजर - उष्ण गुणात्मक , रक्तविशुद्ध करणारे,कफहर तसेच vitamin E चा स्रोत आहे.