चित्र सौजन्य - ReSanskrit website
गेले काही दिवस आपण COVID - 19 च्या निमित्ताने आहार, विहार तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी काही उपाययोजना पाहिल्या. त्यांना सर्वांचाच उत्तम प्रतिसाद मिळाला. मानसिक ताण-तणाव आणि आहार या विषयावर तर इतके प्रश्न आलेत कि सविस्तर लिहावे लागते आहे. मानसिक ताणाविषयी आपण काल माहिती दिली आणि आहाराविषयी आज पाहणार आहोत. आहाराविषयी शंकांपैकी “सध्याच्या वातावरणात काय खावे, कसे खावे, किती खावे ,तसेच व्याधिक्षमत्त्व (Immunity ) वाढवण्यासाठी काय करावे याविषयी प्रश्नांचा रोख अधिक होता. म्हणूनच आता आहार या मुद्द्यावर सविस्तर लिहीत आहे.
व्याधिक्षमत्त्व हे फक्त औषधाने मिळवता येत नाही. म्हणजे व्याधिक्षमत्त्व निर्माण करण्यासाठी आयुर्वेदामध्ये औषधे आहेतच पण कायमचे तसेच अधिक प्रभावी व्याधिक्षमत्त्व निर्माण व्हावे यासाठी सद्वृत्त (Diet and Routine Correction) अधिक महत्त्वाचे आहे आणि यासाठी ऋतुचर्या म्हणजेच ऋतूनुसार आहार-विहार अतिशय महत्त्वाचा आहे.भारतीय कालगणनेनुसार सध्या वसंत ऋतू सुरु आहे.या ऋतूमध्ये कफदोषाचे नैसर्गिकरित्या प्रकोप होत असतो. म्हणजे असे कि शरीरात निसर्गतःच असणारा कफ दोष थंड ऋतुमुळे (हेमंत ऋतू) वाढतो,साचतो. आणि उष्णता मिळाली (वसंत ऋतू) कि पातळ होतो.(कल्पना करा हं, थंडीमध्ये सतत बर्फ साचला की मोठे हिमखंड तयार होतात आणि उष्णता वाढली की हे हिमखंड वितळून नद्यांना पूर येतात.) त्याचप्रमाणे हा वाढलेला, साचलेला कफ पातळ झाला कि शरीरात जी स्थिती तयार होते त्यास कफप्रकोप असे म्हणतात. वेगवेगळ्या आजारांसाठी ही स्थिती पोषक असते. जसे की सर्दी-खोकला-तापासारखे श्वसनसंस्थेचे आजार , वेगवेगळे विषाणूजन्य आजार (viral infections) किंवा अपचन-आम्लपित्त- भूक मंदावण्यासारखे पचनाचे आजार, तसेच सोरायसिस-एक्झिमासारखे त्वचाविकार होताना किंवा आधीच झालेले असल्यास अधिक बळावताना दिसतात. हे त्रास होऊ नयेत किंवा आधीच असतील तर अधिक बळावू नयेत म्हणूनच नियमित ऋतुचर्या महत्वाची असते.
यासाठी काय टाळावे आणि कोणते नियम पाळावे हे पुढील तक्त्यात दिले आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे थोडासा change म्हणून बऱ्याच जणी (आणि काही जणसुद्धा) छान-छान पाककृतींचे फोटोज शेअर करत आहेत. वेगवेगळी Challanges शेअर होत आहेत.
चला तर मग आपणही एक challenge करूया, “वसंत ऋतू रेसिपी Challenge.”
यात मी तुम्हाला challenge करतेय, वर लिहिलेल्या पदार्थांपासून एखादी छानशी पाककृती बनवा आणि share करा.
तळटीप -
* बाजरी - बाजरी हे धान्य मूलतः उष्ण गुणाचे आहे. त्यामुळे वसंत ऋतूमध्ये वापरताना देखील वातावरणातील उष्णतेप्रमाणे जपून वापर करावा.
**मांस - मांस सेवन करताना शक्यतो भाजलेले Barbeque केलेले मांस निवडावे पण याला मसाला कमी लावावा.
***मध - मध कफ कमी करणारा उष्ण गुणाचा आहे. त्यामुळे गोडवा येण्यासाठी वापरता येतो. मात्र मध चुकूनही गरम करू नये.









